माझी ब्लॉग सूची

रविवार, जून २७, २०१०

आपल्याकडे कसे देशस्थ कोकणस्थ वगेरे भेद आहेत तसेच भेद इकडे निमाडी अन मालवी संस्कृतीतही दिसुन येतात. मला वाटायचे की हे फक्त आपल्यातच आहे कि काय? हे जसे इथल्या संस्कृतीत आहे तसेच बंगाली लोकांमध्येही असे भेद आहेत म्हणे.म्हणजे कुठेही जा माणुस इथुन तिथुन सारखाच.
एखाद्या पोटशाखेतील माणसाचा आलेला अनुभव आपण त्या पुर्ण जमातीला शाखेला लावतो अन त्यावरुन आपले मत  आपण बनवतो हे कितपत योग्य आहे.त्या समुहाची एक जगण्याची विशिष्ठ रित असेलही पण म्हणुन त्या व्यक्तीला नावे ठेवणे गरजेचे आहे काय?
dont hate in plurals. असे मला नेहमी म्हणावेसे वाटते.एखादा माणुस आत्ता असा वागला तरी दरवेळी तो तसाच वागेल ह्याचीही खात्री नाही देता येत तर...
तो तसा वागला ह्याला तात्कालिक परिस्थितीही कारणीभुत असतेच की!
कदाचित तो त्यावेळेला disturb असेल.थकलेला असेल किंवा अन्य काही कारणाने उदास असेल तर त्याच्या ह्या upset मुड मध्ये त्याला पहिल्यांदा बघणारा माणुस हा ना असाच upset minded आहे असे लेबल लाउन गेला तर. ह्यात दोघांचाही दोष नाही,नाण्याच्या दोन बाजु आहेत ह्या प्रत्येकाला आपली बाजु योग्य वाटते. कधितरी तटस्थ राहुन,सकृतदर्शनी निर्णय टाळायला हवा का? एखाद्या विषयी लगेच असा ग्रह करुन घेणे बरोबर नाही ना?

शुक्रवार, जून २५, २०१०

वटपोर्णिमा

काल वटपोर्णिमा झाली,त्या निमीत्ताने वेगवेगळ्या चर्चेला उत आला.ती करावी न करावी सारख्या अनेक विषयांवर सर्वत्र साधकबाधक चर्चा वाचायला मिळाली.
वडाची पुजा नवर्‍याच्या आयु:वृध्दीसाठी असेल असे नाही मला वाटत.सावित्रीचा नवरा त्या पुजेवेळी तिथे जवळच निपचित पडलेला होता.(आपले नवरे वडाला फेर्‍या मारताना असतात का बरोबर?) त्यावेळी वडाच्या डेरेदार सावलीच्या आडोशाने त्याला ताजेतवाने केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.(नाहीतरी वडाच्या झाडापासुन जास्त प्राणवायुचे उत्सर्जन होते असे म्हणतात.)
राहता राहिला प्रश्न की त्या यमाला तिने बरोबर शाब्दिक जंजाळात अडकवले अन मनासारखा वर मिळवला.याचा अर्थ तिचे मार्केटिंग स्किल जबरदस्त असावे.(नाहीतरी आजच्या काळात असे ग्राहकांना बरोबर गळी उतरवणारे लोकच जास्त नफा मिळवतात ना.)मग तुम्ही म्हणाल यात यमाचा फायदा काय,त्याचा काय फायदा नाय पण आपल्याला बी टोपी घालणारा कोणीतरी भेट्ला ह्यावरुन पुढच्या काळात त्याने विचार करुन बोलण्याची काळजी घेण्याचा धडा यातुन मिळवला असावा.
जोक्स अपार्ट पण मुद्दा हा की परंपरा आहे म्हणुन याचे पालन करायचे का नाही?
माझ्या मते त्या प्रथेच्या निमीत्ताने जर पर्यावरणाचा र्‍हास होणे थांबणार असेल तर अशा परंपरा चालु राहिल्या तरी चालेल.पुजेला भविष्यात वड रहावा म्हणुन आसपासची वडाची झाडे जर वाचत असतील तर...(हा घरी वडाची फांदी तोडुन आणुन पुजा करणार्‍यांनी ती न केलेलीच बरी)
पत्रीपुजेच्या निमीत्ताने झाडाची पाने ओरबाडण्यापेक्षा प्रथा बदलुन पत्री साठी लागणार्‍या झाडाचे उपयोग त्या पानाऐवजी देवासमोर उच्चारले तर (तेवढीच माहितीत भर) आजुबाजुला त्या झाडांची लागवड करता आली तर ती करावी म्हणजे येणार्‍या पिढीला त्या झाडांची त्यांच्या गुणवैशिट्यांची माहिती तर होईल.
निर्माल्याचा खतासाठी उपयोग केला तर चांगले खत बनेल.(पण जर हे करणे शक्य नसेल तर देवाला फुलांचे भारेच्या भारे वाहुन नद्या खराब करण्यापेक्षा नुसते हात जोडणे जास्त पुण्यदायक होईल.) 

शुक्रवार, जानेवारी १५, २०१०

प्रसंग एक:सकाळी समोर रहाणारी मुलगी आली होती.कालच हातावर मेंदी काढली होती मी तिच्या, त्या 7-8 वर्षाच्या मुलीला हाताच्या मागेही मेंदी काढुन हवी होती.ती सकाळी आली तेंव्हा मी पोळ्या करत होते. म्हणुन तीला दुपारी बोलावले.ती म्हणाली "दुपारी नाही येणार मी, ग्रहण आहे ना! 3.30 नंतर येइन.आई दुपारी बाहेर जाऊ नको म्हणाली".
प्रसंग दोन :मुलीच्या शाळेत आज परिक्षा होती,12.30 ची शाळा अन 12.20  झालेतरी व्हॅन आली नाही म्हणुन फोन लावला,"आज तो छुट्टी है, आज ग्रहन आ गया ना,आज की परिक्षा 25 को लेंगे."इति व्हॅनवाला.
प्रसंग तीन: मुलीची मैत्रीण  आली होती खेळायला, वय 3.5 .मला म्हणाली," काकु आज मी आंघोळ नाही केली".मी म्हणाले "चालते एखादेदिवस आज थंडी जास्त आहे ना म्हणुन आईने नसेल घातली आंघोळ". ती म्हणाली," नाई बाबा पण आज दुपारीच करणार आहेत आंघोळ आज ग्रहण आहे ना,दुपारी करतात का कधी अंघोळ?" आता काय उत्तर द्यावे या विचारातली मी.(तिची आई सकाळी आठाच्या आत अंघोळ करते त्याशिवाय ती काही काम करत नाही.) ती विचारत होती की,"तुम्ही पण परत आंघोळ करणार का?"
हे दोन तीन  प्रसंग घडतात तोवर टी.व्ही वरचे ग्रहणाचे क्लिपींग बघुन मी पण काळ्या फिल्म मधुन सुर्य बघु लागले.काय मस्त दिसला तो सुर्य. कधी अशी कोर पाहिलीच नव्हती ना सुर्याची. वा फार मस्त वाटले.हे ही छोटे मोठे आनंदाचे कवडसेच.ते पाहुन शेजारच्या घरातल्या मुलीने विचारले की "मी पण बघु का?"मी म्हणाले "बघ की",काळ्या सुर्यचष्म्यातुन माझ्या मुलीला पण दाखवला मी सुर्य ती पण म्हणाली," आज सुर्याबाप्पाचा चंदामामा झालाय" म्हणुन.पण ती बारावी सायंसची ताई आली नाही ती म्हणाली "आई नको म्हणाली". तीच्यामागेच तीची msc फिजिक्स झालेली मावसबहिण उभी होती.तीने तर यावर बघण्याची उत्सुकता सोडाच पण काहीही भाष्यही केले नाही.(फार प्रयत्नाने आत्ताच लग्न जमले आहे तीचे कदाचित त्याच विचारात असेल ती)
नंतर मी झोपले असताना माझ्या मुलीने परत तो चष्मा लावला अन आता सुर्यबाप्पा पुर्ण दिसतोय का ते मी पाहते असे म्हणाली.
इथे मला कोणाला कमी दाखवायचे नाही किंवा माझी मुलगी कशी हुशार हेही सांगायचे नाही पण चार वेगवेगळ्या वयोगटाच्या अन वेगवेगळ्या कुटुंबातील मुली माझ्या समोर आल्या त्यावरुन मनात तयार झालेल्या चित्राला मी शब्दबध्द केले इतकेच. ह्या सगळ्या आपल्यासारख्या सुशिक्षित घरातल्या मुली आहेत मला परंपरा पाळण्याविषयी वा स्वछतेविषय़ीही काही म्हणायचे नाही पण आज आपण एखाद्या गोष्टीचे अंधानुकरण करण्यापेक्षा त्या मुलींनी ह्या ग्रहण बघण्याचा आनंद घेतला असता तर..... 3043 ला परत असे दिसणार आहे म्हणे असे ग्रहण, परत बघण्यासाठी आपण असणे शक्यच नाही तर मग with proper precaution आत्ताचे  हे ग्रहण बघायला काय हरकत!.त्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीला काय माहित की ग्रहण काय,अन त्या नंतर आंघोळ का करायची? ती हेच वातावरण बघत मोठी झाली तर.....बर त्यापेक्षा मोठ्या अन science backround च्या मुलींचीही ह्याविषय़ीची अनास्था मला जास्तच हलवुन गेली.हे एका मोठ्या इंदोर सारख्या शहरातील दृष्य तर इतर गावात तर.......