माझी ब्लॉग सूची

शनिवार, सप्टेंबर १९, २००९

घननघनन घन घनन घन मंगल छायो.:



मायबाप चित्रपटातील गाणी ही क्लासिकल बेस आहेत.त्यातील . " घनन घनन"हे गाण मी जेंव्हा पहिल्यांदा ऐकलं त्याच वेळेला मला ते गाणं प्रचंड आवडलं. त्यामुळे मला ते गाणं इथे लिहावसं वाटतयं.


घननघनन घन घनन घन मंगल छायो.:पावसाच्या नुसत्या चाहुलीनेही सगळीकडे वातावरण प्रसन्न झाले आहे.

बादलोंकी डोली मे बरखा आयो.:किती छान कल्पना आहे की ढगांच्या डोलीत बसुन एखाद्या राणी सारखी ती हळुहळु खाली अलगद उतरते आहे.

बुंदे हे दंग बिजुरी के संग बाजे मृदंग: पावसाचे हे टपोरे थेंब विजेच्या कडकडाटाबरोबरच मृदंगासारखाच नाद ह्या पृथ्वीवर येताना करतात असाच भास होतो.किती खरं आहे पहिल्या पावसाचा तो टपटप नाद अगदी नादवायला लावतो.

धरतीका अंग जलथल हो जायो: त्या पहिल्या पावसाच्या अशा वर्षावाने धरा अगदी अंतरबाह्य भिजुन जाते.

मनमन के द्वार खोले किवाड चले आरपार दु:ख तारतार:ह्या पावसाने मनाच्या सगळ्या दारंखिडक्या उघडल्या गेल्या आणी मनात खोलवर दाबुन ठेवलेली दु:ख ह्या पावसाच्या ओल्या शिडकाव्याने धुतली गेली.

मोरी प्यास बुझी फिर सुझ सुझी:किती खरं आहे जोवर स्वत:च्या प्राथमिक गरजाही भागल्या गेल्या नाहीत तर कोणी कितीही चांगुलपणाच्या गोष्टी सांगीतल्या तरी त्यासारखे वागणे जमेल का?पावसाचे कौतुकही त्याच्या आगमनाने तृप्त झाल्यावरच करणे शक्य आहे ना!

आयेहे एसे चैतन्य जैसे:तुझ्या येण्याने सगळीकडे नुसते चैतन्य सळसळले आहे.

मोरी उजड गयी मरुभुमी पर नाचे है मोर बनके फुहार:माझ्या ह्या ओसाड झालेल्या जमीनीवरही तुझ्या सरी मोराप्रमाणे थुईथुई नाचताहेत.त्यामुळे वातावरणच एकदम नादमय झाले आहे.

जल आयो जीवन आयो अब फिरसे सृष्टी जागेगी.:किती खरे आहे नाई.पाण्याशिवाय जगणे शक्य आहे का?धरेच्या उदरातुन अंकुर उगवण्यासाठीही पावसाचीच तर गरज आहे.

भुले बिसरे भटके देहं अब फिरसे दृष्टी जागेगी:मनातल्या जागलेल्या इछेमुळे डोळ्यात उद्याची स्वप्ने दिसु लागतील.

अब खिलेंगी कलिया और बहारे आनेको आतुर होगी:पृथ्वीच्या उदरातुन फुले उमलण्यासाठी उत्सुक असतील.सगळी झाडे फुलांनी,कळ्यांनी भरुन जातील.

इक राह मिली इक चाह मिली गिरनेसे पहिले बाह मिली:तुझ्या येण्याने मनात अनेक आशा निर्माण झाल्या. माझ्या जगण्याला अर्थ मिळाला.मला उध्वस्त होण्यापासुन तु वाचवलस.

बरसो तुम ऋतुराज निरंतर जीवन चलता रहे चिरंतर:किती यतार्थ वर्णन केलंय पावसाचं.खरच तो सगळ्या ऋतुंचा राजाच आहे.त्याच्यामुळेच इथे जीवन आहे.त्यामुळे तो कायम बरसतच रहावा.हे जीवन असेच पुढे चालु रहायला त्याच्यामुळेच मदत मिळणार आहे.पृथ्वीवरची जीवसृष्टी चिरंतर इथे आनंदाने नांदावी यासाठी तुच हवा आहेस.

आज है हम कल अगले होंगे,कालचक्र चलता जायो: आज तुझे गान गाणारे आम्ही आहोत. कारण तुझ्या कृपेची आज जशी आम्हाला गरज आहे,तशीच उद्या येणार्‍या पिढीचीही गरज भागवण्यासाठी तु असायलाच हवास.आम्ही आज तुझ्या कृपेचे अभिलाषी आहोत उद्या कोणी दुसरे तुझ्यासाठी आळवणी करतील,तेंव्हा तु मात्र असाच बरसत रहा.तरच हे कालचक्र चालु राहील.

किती आशेचे गान आहे हे!त्याची आळवणी फक्त स्वत:साठीच नाही तर उद्या येणार्‍या पिढीलाही त्याची गरज आहे हा किती मोठा विचार आहे.स्वत:पुरता विचार न करता आपण सगळ्यांच्या उपयोगी पडावे हा विचारही आपण पावसाकडुनच तर शिकलोय.तो ही नियमानी आपल्यासाठीच तर येतो.

३ टिप्पण्या:

साधक म्हणाले...

सुंदर आहे ते गाणं. मला सुद्धा खूप आवडतं.

भानस म्हणाले...

होय गं अतिशय तरल अनुभूती करून देणारं गान आहे हे. चला आज दिवसभर ऐकायला हवे. खूप छान लिहीलस.भापो.:)

Unknown म्हणाले...

Gaana khup sundar aahe mi purvi eikla hota pan aata sadya mala ha track online milat nahi A so unable to download and listen again